प्राण आणि मन यांचा विलय आवश्यक
जोवर प्राण चालत आहेत आणि मन जीवंत आहे तोवर ज्ञान कसे प्राप्त होणार? जो प्राण आणि मन यांचा विलय साधतो तोच मुक्त होतो. अन्य कोणीही नाही.
~ हठयोग प्रदीपिका (अध्याय चौथा)
विविध योगसाधनांचा सूक्ष्म अभ्यास केल्यास असे आढळते की त्यांचे उद्दीष्ट एकतर प्राणावर ताबा मिळवणे हे आहे किंवा मनावर ताबा मिळवणे आहे. कुंडलिनी योगमार्गावर या दोनही तत्वांवर हळूहळू ताबा मिळवला जातो. प्राणावर ताबा मिळवण्यास प्राणायाम हा मुख्य उपाय आहे तर मनावर ताबा मिळवण्यास ध्यान हा मुख्य उपाय आहे. अजपा साधनेत या दोनही प्रकारांचा सुंदर मिलाफ आपल्याला दिसून येतो. जोवर प्राण किंवा मन सूक्ष्म स्तरावर जागृत आहेत तोवर साधकाला समाधी अवस्था पूर्णत्त्वाने साधत नाही. जेव्हा प्राणशक्ति आणि मन:शक्ती आदिशक्तिमध्ये विलीन होतात तेव्हाच साधकाला मुक्ति मिळते.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम
आपल्याला हा लेख आवडला असल्यास या लेखाची लिंक (URL) आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करण्यासाठी कृपया खालील सुविधेचा वापर करावा.