प्राण-अपानाचे अस्तित्व चैतन्यावर अवलंबून
देहधारी प्राण आणि अपान (श्वास आणि उच्छ्वास) यांमुळे जीवंत असत नाही. काही अन्य तत्व आहे ज्यावर या दोघांचे अस्तित्व अवलंबून आहे.
~ कठोपनिषद
सर्वसाधारणपणे आपण असे म्हणतो की श्वास चाललेत म्हणून जीवन सुरू आहे. परंतु सूक्ष्म विचार केल्यास असे आढळेल की श्वासोच्छवास मूळ जैविक उर्जेमुळे घडत आहे. योगशास्त्रानुसार ही ऊर्जा म्हणजे महाप्राण, चैतन्य किंवा शक्ति. या जैविक शक्तीवरच देहधार्याचे समस्त व्यवहार अवलंबून आहेत. जैविक ऊर्जा, पंचप्राण, कुंडलिनी ही सर्व आदिशक्तीचीच विविध रुपे आहेत. अजपा साधनेचा अभ्यास दृढ झाल्यावर असा अनुभव येतो की ध्यानाला बसल्यावर श्वासोच्छवास कमी-कमी होत आहेत आणि अत्यंत प्रगत योग्याच्या बाबतीत तर ते पूर्णतः थांबतात. हाच केवल कुंभक किंवा सहज कुंभक. असा समाधिस्थ योगी वरकरणी मृतप्राय दिसतो पण देहात "अन्य तत्व" असल्याने जीवंतच असतो.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम
आपल्याला हा लेख आवडला असल्यास या लेखाची लिंक (URL) आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करण्यासाठी कृपया खालील सुविधेचा वापर करावा.